logo

शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एक कारण सांगावे - आमदार कैलास पाटील



शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे आवाहन

धाराशिव (प्रतिनिधी) मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली असुन त्या शेतकऱ्यांनी त्यांना पुन्हा मतदान करावे अस एक तरी काम सांगावे असे अवाहन आमदार कैलास पाटील यानी मतदारांना केले आहे. ते नायगाव (ता.कळंब) येथील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दादा दुधगावकर, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, दिलीप पाटील, रणजित बागल, बाळासाहेब माकोडे, लिंबराज शितोळे, सुधाकर शितोळे, बालासाहेब शितोळे, व्यंकट माळी,अजय समुद्रे, हनुमंत पाटील, शरद टेकाळे, नासेर पठाण, बी.एन. डोंगरे,बाळासाहेब बोंदर,गौतम ओव्हाळ,केशव शितोळे, रामलिंग साकळे, उद्धव शितोळे, विष्णू बापू लामतुरे, राजाभाऊ शितोळे, सत्तार मनीयार, ऋषीकेश गडकर,विजय वाघे,शंभू बिडवे,दत्ता आवाड,नारायण गुंड,बाळासाहेब गुंड,सुरज टेकाळे, बाळासाहेब सरवदे, उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, दहा वर्षापुर्वी जे शेतमालाचे दर होते तेच आजही आहेत. दुसऱ्या बाजुला उत्पादनाचा खर्च हा दुपट्टीहुन अधिक पट्टीने वाढला आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीना तोंड देताना त्याला सर्वाधिक त्रास महागाईचा बसत आहे. जीएसटीने तर शेतकऱ्यांची लुटच होत आहे,खते व शेतीच्या विविध साधनावरील वस्तुवर जिजया करातच शेतकऱी होरपळुन जात असल्याचे आमदार पाटील म्हणाले.




दुसऱ्या बाजुला नुकसान होऊनही विमा कंपन्या सरकारच सोडा पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे वास्तव आहे. मग या कंपन्या सरकार का पोसत आहे याचे कारण इलेक्टॉरल बॉन्ड एवढच दिसत आहे. कारण या कंपन्या आपल्या नफ्यातील पैसा थेट भाजप पक्षाकडे वळवित असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर अशाप्रकारे दुसरीकडे जात असेल तर शेतकरी कंगाल अन सत्ताधारी मालामाल अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मतातुन सरकारला धडा शिकवण्याची योग्य वेळ आली असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.
























4
1100 views